Sadhguru Jaggi Vasudev Shared Weight Loss Tips Your Inner Soul Also Feel Positive and Happy; Sadhguru यांनी सांगितलेल्या ७ टिप्सने थुलथुलीत लटकणारी चरबी करा कमी, शरीरच नाही तर मनही राहील प्रसन्न

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

​ताजे खा

​ताजे खा

तुमचा आहारा हा तुमच्या शरीरासाठी इंधनाप्रमाणे आहे. त्यामुळे खाताना आपण काय खातोय हे नक्की तपासा. सद्गुरू योगातील संदर्भ देत सांगतात की, शिजवलेले जेवण हे दीड तासाच्या आत खाणे गरजेचे आहे. त्यानंतर जर ते खाल्ले आणि पोटात गेले तर त्या जेवणाचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. यामुळे तुम्हाला डायनामिझम सारखा त्रास होण्याची शक्यता असते.

​फ्रूट डाएट

​फ्रूट डाएट

वजन कमी करताना तुमची पचनशक्ती उत्तम असणे गरजेचे आहे. अशावेळी सद्गुरू पचनक्रिया चांगली करण्यासाठी आहारात फळांचा समावेश करण्याचा आग्रह करतात. फळांमध्ये असलेल्या व्हिटॅमिनमुळे शरीराला आवश्यक असलेला पोषणतत्वांचा पुरवठा होतो. एवढंच नव्हे तर फळाच्या सेवनामुळे मेंदू आणि शरीर कायमच अलर्ट असतात. यामुळे तुम्ही आनंद घेऊ शकता.

​​(वाचा – दातदुखी, कॅविटी आणि पिवळसरपणाने हैराण झालात तर बाबा रामदेव यांचे चार उपाय नक्की वापरा, ३ दिवसांत मिळेल आराम)

​कच्चे पदार्थ खा

​कच्चे पदार्थ खा

सद्गुरू सांगतात की, प्रत्येक पदार्थांमध्ये जीव असतो ज्यामुळे तुम्हाला दीर्घायुष्य मिळण्यासाठी मदत होते. जेव्हा तुम्ही कच्चे पदार्थ खाता तेव्हा त्यामधील जीवनसत्त्वे अगदी जशीच्या तशी पोटात जातात. पण जर तुम्ही त्यांना शिजवता तेव्हा त्याचं जीवन उद्धवस्त करता. याचा परिणाम तुमच्या आहारावर होते. यामुळे तुमचं वजन वाढत जातं आणि ते कमी होण्याचं नाव घेत नाही.

​दिवसातून २ वेळाच आहार पुरेसा

​दिवसातून २ वेळाच आहार पुरेसा

सद्गुरूंनी पुढे सांगितलेली गोष्ट तुम्हाला थक्क करेल पण दिवसातून २ वेळाच आहार करणे गरजेचे आहे. उत्तम आरोग्य राहण्यासोबतच तुमची पचनक्रिया उत्तम असणे गरजेचे आहे. कारण हेच बारीक होण्याचं मंत्र आहे. केलेला आहार पचण्यासाठी वेळेची गरज असते यामुळे तुमची पचनक्रिया आणि कोलोन पद्धत चांगली राहते. जर या दोन वेळेच्या आहारामध्ये फळांचे सेवन केल्यास वजन कमी होते. तसेच दोन मिलच्यामध्ये सहा ते आठ तासांचा गॅप असणे गरजेचे आहे. जर हे शक्य नसेल तर ४ ते ५ तासाचे अंतर ठेवा.

​(वाचा – पावसाळ्यात कमी पाणी पिऊनही सतत लघवीला का होते? डॉक्टरांनी सांगितलं कारण)

​प्लांट बेस आहार

​प्लांट बेस आहार

सद्गुरू वजन कमी करण्याबद्दल बोलत असताना म्हणाले की, आहारात प्लान्ट बेस डाएटचा समावेश करा. यामुळे शरीर आणि मन दोन्ही शांत आणि निवांत राहतं. याचा कोणताच त्रास होत नाही. अपचन आणि मळमळ सारखी समस्याही दूर राहते.

​मल्टीग्रेन डाएट

​मल्टीग्रेन डाएट

लाखो भारतीयांना सध्या मधुमेहाने ग्रासल आहे. आणि अनेकांचा कार्बोहायड्रेटयुक्त आहार घेत आहेत. हीच जीवनशैली अनेक आजारांसाठी कारणीभूत आहे. महत्वाचं म्हणजे आहारात कडधान्ये, भरपूर हरभरा कडधान्ये, शेंगा आणि अनेक प्रकारची धान्ये खातात. पण हळुहळू त्या गोष्टी निघून गेल्या आहेत, कारण लोक आता जास्त भात किंवा तृणधान्ये आणि भाज्या कमी खातात, निरोगी जीवनासाठी हे उलट करणे आवश्यक आहे. “हा एक मूलभूत वैचारिक बदल आहे जो लोकांच्या मनात व्हायला हवा.

यासोबतच तुम्ही शेंगदाण्याचे सेवन केल्यास फायदेशीर ठरते. शेंगदाणे हे शरीरासाठी उत्तम स्त्रोत मानले जाते. केळी आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये वाटून ते प्यायल्यास फायदाच होतो.

​(वाचा – ७ सुपरफूड जे ३० दिवसांत करतील कमाल; चाळीशीतही दिसेल अगदी विशीचा तजेलपणा)​

​चावून खा

​चावून खा

जेवताना कायम लक्षात ठेवा की प्रत्येक घास हा २४ वेळा चावणे गरजेचे आहे. कारण पदार्थ पोटात जाण्यापूर्वीच तो चांगल्याप्रकारे पचला पाहिजे. तसेच कोणताही पदार्थ २४ वेळा चावल्यामुळे त्यातील सर्व पोषकतत्व शरीराला चांगल्याप्रकारे मिळतात.

​(वाचा – Ketone Drink मुळे खरंच कंट्रोलमध्ये राहतो डायबिटिस? जाणून घ्या नव्या संशोधनातील धक्कादायक माहिती)

​मध

​मध

मधाचा आहारात समावेश करणे अत्यंत महत्वाचे आहे. दिवसाची सुरूवात जर कोमट पाण्यात मध टाकून केल्यास त्याचा वजन कमी करण्यासाठी फायदा होतो. यामुळे तुमच्या शरीरातील पचनक्रियेची सुरूवात होण्यास फायदा होतो.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts